संजय भाऊ बद्दल

संजयभाऊ देशमुख यांनी लोकाग्रहाखातर तसेच स्थानिक समस्यांचं वलय संपुष्टात आनण्यासाठी राजकिय व्यवस्थेत उतरण्याचा निर्णय घेतला. राजकिय पाश्र्वभूमी, राजकिय वारसा किंबहूना कोणताही राजकिय 'गॉडफादर' नसताना यवतमाळ जिल्हा प्रमूख - आमदार ते थेट क्रिडामंत्री म्हणून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. तसेच सहकार क्षेत्रामध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. एका दशकाहूनी अधिक वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (दिग्रस) संचालकपद भूषविले व आजही ते कार्यान्वित आहेत. भाऊंनी सामाजिक बांधिलकी राखत आदिवासी, भटक्या जमाती, मागासवर्गियांची मोफत शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आपल्या भागात निवासी आश्रमशाळांची उभारणी केली. आता पर्यंत हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी विविध क्षेत्रात आपले करिअर घडवताना दिसतात. बेरोजगारीचा प्रश्न शिक्षणाची संधी उपलब्ध करून तुर्तास मार्गी लावला. असे असले तरी स्थानिक युवकांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे उत्थान व्हावे, त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यास संजयभाऊ वचनबद्ध आहेत. तद्वतच दिग्रस-दारव्हा-नेर भागातील प्रचंड प्रमाणात असलेल्या सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी भाऊ प्रयत्नशील आहेत. इथल्या तरूणांना रोजगार, लघुउद्योगांसाठी संधी आणि शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी उपलब्ध करुन देण्याचे भाऊंचे ध्येय आहे. पुढे वाचा
भविष्यातील ध्येय / धोरण
संजयभाऊंनी आपल्या संपूर्ण राजकिय कारकिर्दमध्ये सामाजिक समरसता हेच प्रमूख ध्येय बाळगले. राजकिय वाटचाल करताना राजकारणात कधीच यशापयशाची पर्वा केली नाही. समता, न्याय, बंधुता या त्रिसूत्रीशी कधी तडजोड केली नाही.
- सर्व कार्य
- भूमीपूजन
- सामाजिक
- स्पर्धा
थेट अद्यतने
न्यूज़ आणि मिडिया
माझ्याबद्दल नवीनतम बातम्या आणि मीडिया शोधा.